परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारात चालू महिन्यात १४ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी ९ मे पर्यंत शेअर बाजारात १४ हजार १६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
सोबतच या गुंतवणूकदारांनी ३ हजार ७२५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. एप्रिल महिन्यात झालेल्या ४ हजार २२३ कोटी रुपये गुंतवणुकीनंतर शेअर बाजाराला सकारात्मक गती मिळाली आहे.