भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर आज सकाळी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक २ हजारांहून अधिक अंकांनी वधारला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ७००हून अधिक अंकांची वाढ दिसून आली.
परकीय गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक आणि जागतिक पातळीवरचे सकारात्मक संकेत यांमुळे ही वाढ दिसून आल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.