अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सात जणांचा मृत्यू झाला आहे. यातले पाच जण एअर इंडियाचे कर्मचारी होते. वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल हे पवईचे रहिवासी होते. तर त्यांचे सहकारी दीपक पाठक हे बदलापूरचे रहिवासी होते. डोंबिवली इथल्या रोशनी सोनघरे, पनवेलच्या मैथिली पाटील आणि गोरेगाव, मुंबई इथल्या अपर्णा महाडिक हे कर्मचारीही विमानात होते. सांगली जिल्ह्यातले महादेव पवार आणि त्यांच्या पत्नी आशा पवार हे प्रवासीही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत.