सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सतत कार्यरत आहे. सेवापर्व या मालिकेत भारतीय रेल्वेतल्या सुधारणांबद्दल जाणून घेऊया…
गेल्या दशकभरात रेल्वेमधे मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या असून रेल्वे ही देशाच्या प्रगतीची वाहक झाली आहे. प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि उच्च दर्जाचा अनुभव देण्याचा प्रयत्न रेल्वे करत आहे. रेल्वेने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचा भारत जोडला गेला आहे.
सरकारने अमृत भारत ट्रेन आणि नमो भारत जलद ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या. येत्या दोन वर्षांत २०० नव्या वंदे भारत गाड्या, शंभर अमृत भारत गाड्या, ५० नमो भारत जलद गाड्या आणि १७ हजार ५०० साधारण गाड्या प्रवाशांसाठी सज्ज होणार आहेत. अमृत भारत स्थान योजने अंतर्गत १३०० स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला. रेल्वेच्या सुरक्षेसाठी सरकारने कवच यंत्रणेची निर्मिती केली. प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वसनीय रेल्वे सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सरकार राष्ट्रीय रेल्वे योजना राबवणार आहे.