यवतमाळ जिल्ह्यातल्या ७६ क्षयरोगमुक्त ग्रामपंचायंतींची निवड

प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान अंतर्गत सन २०२३ साठी यवतमाळ जिल्ह्यातल्या ७६ क्षयरोगमुक्त ग्रामपंचायंतींची निवड झाली आहे. हा कार्यक्रम वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कऱण्यात आला होता. यावेळी संरपंच आणि सचिवांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते करण्यात आला.