भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातल्या पहिल्या डावात भारताकडे ३७८ धावांची आघाडी
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत भक्कम स्थितीत असून भारतानं ३७८धावांची आघाडी घेतली आहे. यशस्वी जयसवाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांच्या जोरावर भारतानं ५ बाद ५१८ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. जयसवालनं १७५ धावा केल्या तर शुभमन गिलनं नाबाद १२९ धावा केल्या. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघाची सुरुवात मात्र अडखळत झाली. कालचा खेळ संपला तेव्हा वेस्टइंडीजच्या ४ बाद १४० धावा झाल्या होत्या.