डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूमधून प्रस्थान

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज देहू इथं सुरु झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुकांचं पूजन झालं, त्यानंतर पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली. देहू इथे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या भेटीच्या समूहशिल्पाचं आणि संतसृष्टीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. या सोहळ्यात सुमारे ५०० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वरांची पालखी उद्या आळंदीहून प्रस्थान ठेवेल.
त्र्यंबकेश्वर इथून निघालेली संत निवृत्ती नाथांची पालखी काल अहिल्यानगर मधे पोहोचली. यावेळी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं अश्व रिंगण काल हिंगोलीच्या रामलीला मैदानावर उत्साहात पार पडलं.
इतरही मानाच्या पालख्या वारीसाठी रवाना झाल्या आहेत. पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर टोल माफी देण्यात आली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा