माहिती अधिकार कायदा सक्षम बनवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेस सरकारनं आणलेल्या माहिती अधिकार कायद्याला आज २० वर्ष पूर्ण झाली, मात्र जनतेला दिलेल्या या महत्वाच्या अधिकाराची धार भाजपा सरकार बोथट करत आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा कायदा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.
Site Admin | October 12, 2025 6:15 PM | Congress | Maharashtra | Right to Information Act
माहिती अधिकार कायदा सक्षम बनवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज – काँग्रेस
