January 2, 2025 7:33 PM | Ratnagiri

printer

रत्नागिरीत ‘किन्नर अस्मिता’ या तृतीयपंथीयांच्या पहिल्या स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापन

रत्नागिरी जिल्ह्यात किन्नर अस्मिता हा तृतीयपंथीयांचा पहिला स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन केला आहे. तृतीयपंथीयांना समाजाबरोबर जाता यावं, यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी या गटाला सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.