डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधानसभा निवडणुकीत ‘आरपीआय’ला योग्य प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा – पक्षाध्यक्ष रामदास आठवले

आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते.

 

लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळालं नसलं, तरी विधानसभेला आम्हाला योग्य प्रतिनिधित्व मिळालं तर त्याचा फायदा महायुतीला निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइनं १२ जागांची मागणी केली आहे. रिपाइंमुळे महायुतीतल्या तीनही प्रमुख पक्षांना चांगला फायदा होणार असल्यानं त्यांनी ही मागणी पूर्ण करावी, असं आठवले म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.