मुंंबईसह राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून आजही काही भागात पर्जन्यवृष्टी सुुरु आहे. रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला असून या अवकाळी पावसाने आंबा पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
रत्नागिरी शहर परिसरासह तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. या पावसाचा मोठा फटका आंबा पिकाला बसला आहे.
अकोला जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी आज सकाळी पुन्हा पाऊस पडला. अकोला शहरासह अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अकोल्यातील पणज परिसरात केळी पिकाला या वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे.
नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ३४३ गावांमधल्या ८ हजार ६४१ शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनानं व्यक्त केला आहे. पावसामुळे २९९घरांची पडझड झाली. याबरोबरच भाजीपाला, डाळिंब, कांदा, टोमॅटो पिकाचंही नुकसान झाला असून कुक्कुट पालन केंद्रांचही नुकसान झालं.