डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 4, 2025 8:15 PM | Rain

printer

देशाच्या ईशान्य भागात पावसाचा जोर कायम

 

मणिपूरमध्ये इम्फाळ पूर्व जिल्ह्यातली ६४३ गावं पुरामुळं बाधित झाली असून, एक लाख ६४ हजार ८०० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. पुरात ३५ हजारहून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दल, पोलिस, निमलष्करी दल, रेडक्रॉस, अग्निशमन दलांकडून पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे.

 

दरम्यान, मणिपूरमध्ये आज पावसाचा जोर कमी झाला असून  बहुतांश नद्यांचं पाणी उतरलं आहे. 

 

आसाममध्ये पूरस्थिती अद्यापही गंभीर असून २१ जिल्ह्यांमधल्या ६ लाख ३० हजारांहून अधिक जणांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातल्या दीड हजारांहून जास्त गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून १४ हजार ७०० हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. SDRF आणि NDRFची पथकं बचावकार्य करत आहेत. ब्रह्मपुत्रा, बराक आणि इतर उपनद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार, २२३ मदत छावण्या उभारण्यात आल्या असून त्यात सध्या ४० हजारांहून जास्त जणांनी आश्रय घेतला आहे. 

 

सिक्कीममधे खराब हवामानामुळे हवाई बचावकार्य थांबवण्यात आलं. खऱाब हवामानामुळे भारतीय हवाई दलाचे हेलीकॉप्टर आज बचावकार्यासाठी जाऊ शकलं नाही. लाचेन इथं अडकलेल्या ११० पर्यटकांना एअरलिफ्ट करण्यासाठी दोन हेलिकॉप्टर्स राखीव ठेवण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं. दरम्यान झेमा आणि छतांग रस्त्यावरून पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी विविध पर्यायांचा शोध घेतला जात आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा