Maharashtra Election : राहुल गांधींची राज्य निवडणूक आयोगावर टीका

महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकीत मतदारांच्या बोटावर लावलेल्या शाईच्या दर्जावरून झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगावर टीका केली. मतचोरी हे देशविरोधी कृत्य असल्याचा पुनरुच्चार त्यांनी एका वृत्तपत्रातल्या बातमीचा फोटो समाजमाध्यमावर शेअर करून केला.

 

या आरोपांना भाजपानं प्रत्युत्तर दिलं. मतमोजणी संपायच्या आधीच काँग्रेस पराभव मान्य करत आहे, असं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. राहुल गांधी यांचा मतचोरीचा आरोप बिनबुडाचा आणि स्वतःचं अपयश लपवण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली.

 

या निवडणुकीत मतदार याद्या आणि इतर अनेक घोळ झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला.