डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 18, 2025 7:54 PM | Rahul Gandhi

printer

मतदान प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

देशभरातल्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा नवी दिल्लीत वार्ताहर परिषद घेऊन केला. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या राजुरा आणि कर्नाटकातल्या आळंद विधानसभा मतदार संघातली उदाहरणं उपस्थितांच्या समोर मांडली.  बनावट अर्ज, काही सॉफ्टवेअर वापरुन मतदारांची नावं वगळणं, बोगस मतदार घुसवणं हे प्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला.

 

राजुरा मतदारसंघात ६ हजार ८५० मतचोरी झाल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआरही दाखल केल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात १८ हजार मते वाढली. एवढी मते कशी वाढली, याचा संशय आल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी तक्रार केली. या तक्रारीवरून सुमारे सहा हजार मते आयोगाने कमी केली, असा दावा काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी केली. उरलेल्या मतांमध्येही बोगस मतदार असल्याचा धोटे यांचा आरोप आहे.

 

दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप हे निराधार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. ऑनलाइन पद्धतीने मतदारांना वगळता येत नसल्याचं स्पष्टीकरण आयोगानं दिलं आहे. २०२३ मध्ये आळंद मतदारसंघातून काही मतदारांना अवैधरित्या वगळण्याचे प्रयत्न झाले होते. याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी एफआयआर दाखल केला होता, असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. २०१८ मध्ये या मतदारसंघातून भाजपा तर २०२३ मध्ये काँग्रेस उमेदवार जिंकून आला होता. 

 

राहुल गांधी संवैधानिक संस्थांवर सातत्यानं आरोप करुन लोकशाहीला कमकुवत करत आहेत. तसंच नागरिकांची ही दिशाभूल करत असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर यांनी केली. 

 

पुरावे नसल्यानं मतचोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना कायदेशीर लढाई लढायचीच नाही. केवळ मतचोरी झाली असा कांगावा करत देशभर राळ उडवून द्यायचा त्यांचा उद्देश असल्याचं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले.)

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.