कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटने प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी माणगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. कुंडमळा इथं पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येनं येतात हे माहीत असतानाही हा धोकादायक पूल खुला का ठेवला असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.
सिंधुदुर्ग जिल्हयात राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला भगदाड पडल्यावरून सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. महायुती सरकारने महापुरुषांच्या पुतळ्यालाही भ्रष्टाचाराची कीड लावली, असा आरोप सपकाळ यांनी केला.