डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पुण्यातल्या इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यानं ४ जणांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला, तर ५१ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. दोन ते तीन जण अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. 

 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

 

या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारनं ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेतल्या जखमींवरही सरकारी खर्चातून उपचार केले जाणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. प्रधानमंत्री मोदी यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून, घटनेची माहिती घेऊन राज्य सरकारला आवश्यक ती मदत देण्याचं आश्वासन दिलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत शहा यांनी परिस्थितीची माहिती घेतली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा