पीयूसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांना इंधन न देण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत ही माहिती दिली. राज्यातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाईल.
त्यानुसार वाहनाच्या पीयूसी वैधता कळेल. पीयूसी संपलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर उपलब्ध सुविधेतून पीयुसी काढता येईल आणि त्यानंतर इंधन भरता येईल, अशी यंत्रणा राबवण्याचा सरकारचा विचार आहे. भविष्यात वाहन विक्री करणारी आणि दुरुस्ती करणाऱ्या दुकानांमध्ये पीयुसी देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. अवैध पद्धतीने पीयूसी देणाऱ्या टोळींविरोधात धडक मोहीम राबवण्याचे आदेशही सरनाईक यांनी दिले.