डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक गोष्ट देशातच तयार व्हावी, ही काळाची गरज-प्रधानमंत्री

देशाच्या विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टी देशातच तयार व्हाव्यात, ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी २०१४ मध्ये भारताचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज ११ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त गुजरातमधे दाहोद इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रेल्वे इंजिन प्रकल्पासह, सुमारे २४ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण मोदी यांच्या हस्ते झालं. देशातलं औद्योगिक उत्पादन आणि निर्यातही सातत्यानं वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक वस्तूंसह रेल्वे आणि मेट्रोचं तंत्रज्ञानही आपण इतर देशांना निर्यात करू लागलो असल्याचं ते म्हणाले.

 

गेल्या काही वर्षात देशानं दशकांच्या बेड्या झुगारणारे अभूतपूर्व निर्णय घेतले आहेत असं त्यांनी सांगितलं. 

 

यानंतर भूज इथं त्यांनी ५० हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन, भूमीपूजन आणि लोकार्पण केलं. या प्रकल्पांमुळे भारताला नील अर्थव्यवस्था आणि हरित उर्जेचं जागतिक केंद्र होण्यात मदत होईल, असं त्यांनी सांगितलं. येत्या काळात हरित उर्जा महत्वाची ठरणार आहे, त्या अनुषंगानंच आज पायाभरणी केलेल्या हरित हायड्रोजन कारखान्यामुळे कच्छ हे हरित उर्जेचं जगातलं सर्वात मोठं केंद्र म्हणून उदायाला येईल, असं ते म्हणाले. जगातल्या सर्वात मोठ्या सौर ऊर्जा केंद्रांपैकी एक केंद्र कच्छमध्ये उभारलं जात प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा