मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवाव्यात – प्रकाश आंबेडकर

मराठा समाजातल्या गरीबांसाठी मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवाव्यात, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. वंचित बहुजन आघाडीनं लातूर इथं काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेत ते बोलत होते. मराठा समाजात श्रीमंत आणि गरीब असे दोन गट आहेत. त्यामुळे जरांगे यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरून सर्व जागा लढवाव्यात असं ते म्हणाले.