ओबीसी समाजाने साथ दिली तर वंचित बहुजन आघाडीला तीन आकडी जागा मिळतील -प्रकाश आंबेडकर

आगामी निवडणुकीत ओबीसी समाजाने साथ दिली तर वंचित बहुजन आघाडीला तीन आकडी जागा मिळतील असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. ते मनमाड इथं आदिवासी सत्ता संपादन परिषदेच्या वेळी बातमीदारांशी बोलत होते. मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गात आरक्षण देऊ नये, या मागणीला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. आदिवासी आणि ओबीसीं समूहांना एकत्र करून तिसरी आघाडी स्थापन करणार असून नागपूरला या तिसऱ्या आघाडीच्या नावाची अधिकृत घोषणा करू असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.