वन्य प्राण्यांचे हल्ले आणि भाताच्या शेतीत पाणी साठल्यानं होणारं नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत संरक्षित केलं जाईल. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळं होणारं पीक नुकसान आता स्थानिक जोखीम श्रेणी अंतर्गत पाचवं अतिरिक्त कवच म्हणून ओळखलं जाईल, तर भातशेतीचं पाण्यामुळं होणारं नुकसान स्थानिक आपत्ती अंतर्गत पुन्हा सुरू केलं जाईल असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं सांगितलं.
पिकांचं नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांची यादी राज्यांद्वारे प्रकाशित केली जाईल. हा निर्णय पुढील वर्षी खरीप हंगामापासून लागू केला जाईल. वर्षानुवर्षे, देशभरातील शेतकऱ्यांना हत्ती, रानडुक्कर, नीलगाय, हरीण आणि वानर यांसारख्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळं वाढत्या प्रमाणात पिकांचं नुकसान सहन करावं लागत आहे.
तसंच पूरप्रवण आणि किनारी राज्यांमधील भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं मुसळधार पाऊस आणि शेतात पाणी भरल्यामुळं नुकसान होत असतं. या कवचामुळं मानव-वन्यजीव संघर्ष जास्त असलेल्या महाराष्ट्रासह ठराविक राज्यांमधील शेतकऱ्यांना लक्षणीय फायदा होण्याची अपेक्षा आहे.