डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राजकीय पक्षांनी दुष्काळमुक्त मराठवाड्याचं लेखी आश्वासन द्यावं-मराठवाडा पाणी परिषदेची मागणी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात दुष्काळमुक्त मराठवाड्याचं लेखी आश्वासन द्यावं, अशी मागणी मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. मराठवाड्यातली सिंचन क्षमता ५० टक्क्यांन वाढवण्यासाठी एकात्मिक जलनिती या योजनेअंतर्गत सर्व पर्यायाचा विचार करून कालबद्ध कार्यक्रम राबवला जावा अशी अपेक्षा देखील मराठवाडा पाणी परिषदेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केली आहे.