डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्र्यांनी कोलंबोतल्या भारतीय शांती सेनेच्या स्मारकाला आदरांजली वाहिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी कोलंबोतल्या भारतीय शांती सेनेच्या स्मारकाला आदरांजली वाहिली. यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी २०१५ सालच्या दौऱ्यादरम्यान या स्मारकाला भेट दिली होती. भारतीय शांती सैन्य १९८७ ते १९९० या कालावधीत श्रीलंकेत तैनात होतं. यादरम्यान या दलाचे एक हजार १६९ सैनिक शहीद झाले तर तीन हजारांहून अधिक सैनिक जखमी झाले होते. नंतर श्रीलंका सरकारने २००८ला या सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे स्मारक बनवलं.