डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 22, 2025 3:24 PM | PM Narendra Modi

printer

अरुणाचल प्रदेशात विविध विकासप्रकल्पांची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी

व्हायब्रन्ट व्हीलेज उपक्रमाच्या यशामुळे सामान्य जनतेचं आयुष्य सुलभ झालं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज अरुणाचल प्रदेशाची राजधानी इटानगर इथं सुमारे ५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी करण्यात आली , त्या वेळी ते बोलत होते.  अरुणाचल प्रदेशाचा विकास म्हणजे भाजपाच्या दुहेरी इंजिन सरकारमुळे मिळणाऱ्या दुहेरी लाभांचं उदाहरण आहे असंही ते म्हणाले. ईशान्येकडील राज्ये देशाच्या विकासाची प्रेरक शक्ती बनत आहेत , असं त्यांनी सांगितलं. 

 

प्रधानमंत्र्यांनी आज इटानगर इथं २ मोठ्या जलविद्युत प्रकल्पांची  आणि १० पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली.