डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारताचं महत्त्व वाढलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारताचं महत्त्व वाढलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे IATA अर्थात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या ८१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते आज बोलत होते. जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारत एक आघाडीची शक्ती म्हणून उदयाला येत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. ‘उडान’ योजना ही भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रातलं सुवर्णपान असून देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रात भारताने जगात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

 

पुढच्या पाच वर्षात देशात ५० विमानतळ विकसित करणार असल्याची घोषणा यावेळी नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी केली. यावर्षीच्या एप्रिल महिन्यापर्यंत देशांतर्गत विमान वाहतुकीत १० टक्के वाढ झाल्याचं नायडू यांनी सांगितलं. (कालपासून सुरू झालेल्या IATA कार्यक्रमाची उद्या सांगता होईल. या कार्यक्रमादरम्यान, जगभरातील नेते भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात झालेल्या उल्लेखनीय परिवर्तनाचे आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात त्याच्या योगदानाचे साक्षीदार होतील, असं प्रधानमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. IATA ची शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा ४२ वर्षांपूर्वी १९८३ मध्ये झाली होती.)

सर्वाधिक वाचले

सर्व पहा