डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 11, 2025 1:41 PM

printer

शेतकऱ्यांच्या मनातही स्वदेशीला प्राधान्य ही संकल्पना रुजत असल्याचं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं प्रतिपादन

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. कृषी उपकरणांवर जीएसटी कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असं कृषीमंत्री म्हणाले. रब्बी पिकांच्या हमीभावात सरकारने वाढ केली, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत ३ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित झाला, असं त्यांनी सांगितलं.  केंद्र सरकारच्या स्वदेशीच्या आवाहनाला शेतकरीही प्रतिसाद देत असून स्वदेशीची भावना त्यांच्यामधे रुजत आहे, असं चौहान म्हणाले.