विद्यार्थ्यांनी स्वतःशी स्पर्धा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करावी आणि मनातल्या भितीवर विजय मिळवावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विद्यार्थ्यांना दिला. परीक्षा पे चर्चा हा संवाद ऐकल्यानंतर ते बोलत होते. परीक्षा हेच अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांनी जीवनातल्या आव्हानांशी सामना कसा करावा हे समजण्यासाठी प्रधानमंत्र्यांशी झालेला संवाद उपयुक्त आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.