परीक्षा पे चर्चा उपक्रमात सहभागी होण्यासाठी तीन कोटींहून अधिक जणांची नोंदणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या परीक्षा पे चर्चा या उपक्रमाने ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. परीक्षा पे चर्चा या उपक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून कालपर्यंत तीन कोटींहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. देशभरातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी यात सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं तसंच परीक्षांच्या अनुषंगाने त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन विकसित करणं, हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. 

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.