पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अतिवृष्टीमुळे गेल्या २४ तासांत किमान ६३ जणांचा मृत्यू झाला असून पाकिस्तान सरकारने ही राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. रावळपिंडी शहरात जोरदार पाऊस झाल्याने नुल्ला लेह मधे अचानक पूर उद्भवला आहे. गेल्या २ दिवसात वीज अंगावर कोसळून किंवा पावसामुळे बांधकाम कोसळून ४४ जण दगावले. बलुचिस्तानमधेही अतिवृष्टीमुळे १६ जणांचा मृत्यू झाला.
Site Admin | July 18, 2025 8:16 PM | Pakistan | Rain
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अतिवृष्टीमुळे ६३ जणांचा मृत्यू
