डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचं भारतासमोर १०६ धावांचं आव्हान

दुबई इथं सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने भारतासमोर १०६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानकडून निदा दार हिने सर्वाधिक २८ धाावा केल्या. भारताच्या अरुंधती रेड्डी हिने तीन, श्रेयांका पाटील हिने दोन तर रेणुका ठाकुर सिंह, दिप्ती शर्मा आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.

 

शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दोन बळीच्या बदल्यात ६१ धावा झाल्या होत्या.
पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज भारत आणि बांग्लादेश यांच्यादरम्यान तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला टी ट्वेंटी सामना ग्वाल्हेर इथं होत आहे. नवोदित वेगवान गोलंदाज मयंक यादव याला या सामन्यात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.