पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसंच त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण आणि रोजगारासाठी मदत करणार असल्याचंही सरकारनं सांगितलं. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली