डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याची शक्ती जगाला समजली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दक्षिण मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून आज मुंबई भाजपाने तिरंगा यात्रा काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यात सहभागी झाले होते. ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय सैन्याची शक्ती जगाला समजली, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पहलगाममधे दहशतवाद्यांनी अतिशय निर्घृणपणे नागरिकांची हत्या केली. त्यामुळे दहशतवाद्यांना नेस्तनाबूत  करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवलं. यात दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करण्यात आले, असं मुख्यमंंत्र्यांनी सांगितलं.

 

पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही. भारताची संरक्षण प्रणाली इतकी मजबूत आहे की ती भेदण्याची क्षमता पाकिस्तानची नाही असं फडनवीस म्हणाले. ही तिरंगा यात्रा सैन्यदलाच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आहे, असं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा