रबी हंगामातील कांद्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे कांद्याचे भाव स्थिर

शेतकऱ्यांनी बाजारात आणलेल्या रबी हंगामातील कांद्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे कांद्याचे भाव स्थिर असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या हंगामात कांद्याचं उत्पादन कमी असूनही देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता पुरेशी असल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या रबी हंगामात अंदाजे 191 लाख टन कांद्याचं उत्पादन देशांतर्गत वापरासाठी पुरेसं आहे असं मंत्रालयानं सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.