मतदारसंघाची पुनर्रचना करताना लोकसंख्या हा एकमेव निकष असू नये, तसंच यावर तपशीलवार चर्चा आणि विचारविनिमय करुनच पुढं गेलं पाहीजे असं बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओदिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी म्हटलं आहे. चेन्नईत झालेल्या बैठकीला त्यांनी दूरस्थ पद्धतीने संबोधित केलं.
कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारे पुनर्रचना करण्यात यावी अशी मागणी आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांनी केली आहे.