डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 23, 2025 9:09 PM

printer

ईशान्य भारत ऊर्जा क्षेत्रांचे केंद्र म्हणून उदयास येत आहे: प्रधानमंत्री

विकसित भारतासाठी ईशान्येकडच्या राज्यांचा विकास आवश्यक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  ईशान्येकडच्या राज्यांमधे गुंतवणुकीच्या संधी उलगडून दाखवणाऱ्या उदयोन्मुख ईशान्य भारत गुंतवणूकदार परिषदेचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या  हस्ते  झालं. त्यावेळी ते बोलत होते. ईशान्येकडच्या राज्यांमधे निसर्गाचं जतन आणि संवर्धन लोकपरंपरेनं केलं असून तिथलं आरोग्यदायी वातावरण गुंतवणुकदारांसाठी एक आकर्षण असल्याचं ते म्हणाले.

 

ईशान्येकडच्या राज्यांमधे पायाभूत सोयीसुविधांचा विकास झाला असल्याचं ईशान्य क्षेत्र विकास विभागाचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. या परिसरात १७ विमानतळ आणि दोन हजाराहून अधिक विमान उड्डाण सेवा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा