डीबीटी व्यवहारांमधे म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणात गेल्या दशकात नव्वद पटीनं वाढ झाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. २०१४ डीबीटी व्यवहारांमधे म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणात गेल्या दशकात नव्वद पट वाढ मध्ये ७ हजार कोटीहून अधिक असलेली डीबीटीची संख्या गेल्या आर्थिक वर्षात ६ लाख कोटीहून अधिक झाल्याचं अर्थमंत्र्यांनी समाज माध्यमवरच्या संदेशात म्हटलं आहे.
२०२४ -२५ या वर्षात २६० लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवहार करत भारतानं रिअल टाईम पेमेंटमध्ये जगात आघाडी घेतली असल्याचं त्यांनी आणखी एका संदेशात म्हटलं आहे. दरवर्षी सुमारे १८ हजार ६०० कोटी रुपयांचे व्यवहार होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.