डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 11, 2025 1:14 PM | ajit pawar | Nepal

printer

नेपाळमधे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सूरु

नेपाळमधे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली. ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे.