यंदाच्या बुद्धिबळ विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे सोपवण्यात आलं आहे. ही विश्वचषक स्पर्धा ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाणार असल्याचं फिडे या जागतिक क्रीडा संघटनेनं आज घोषित केलं आहे. या स्पर्धांचं ठिकाण यथावकाश ठरवण्यात येणार असल्याचं फिडेनं स्पष्ट केलं आहे. या स्पर्धेत २०६ बुद्धिबळ पटु सहभागी होणार असून पहिले ३ क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना २०२६ मधल्या अटीतटीच्या कॅन्डीडेट टूर्नामेंटसाठी थेट पात्र ठरवलं जाणार आहे.
Site Admin | July 21, 2025 8:19 PM | #FIDEWomensworldcup
यंदाच्या बुद्धिबळ विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे
