डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकमहोत्सवी जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची आजची शतकमहोत्सवी जयंती आपणा सर्वांसाठी सुशासनाची प्रेरणा घेण्याचा दिवस आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातल्या खजुराहो इथं देशातल्या पहिल्या, महत्त्वाकांक्षी आणि बहुद्देशीय केन-बेटवा राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या पहिल्या, ओंकारेश्वर तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण, तसंच १ हजार १५३ अटल ग्राम सुशासन भवनांचं भूमिपूजनही मोदी यांनी यावेळी केलं. याशिवाय, वाजपेयींच्या स्मरणार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते झालं. दिवंगत अटल बिहारी वाजपेयी नेहमीच सुशासनाचा प्रेरणास्रोत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.

 

 

गेल्या दशकात देशभरात जलसुरक्षा आणि जलसंवर्धन या क्षेत्रात ऐतिहासिक काम झाल्याचं मोदी यांनी नमूद केलं. याआधीच्या सरकारांनी या क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचं सांगून देशाच्या जलस्रोतांचा विकास करण्याचं धोरण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखलं, असं मोदी यांनी सांगितलं. मध्य प्रदेशचे राज्यपाल मांगूभाई पटेल, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पटेल यावेळी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.