नंदुरबार जिल्ह्यात अस्तंभा यात्रेवरून परतत असलेल्या भाविकांची गाडी चांदशैली घाटात दरीत कोसळून झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेदहाच्या सुमाराला घाटातल्या वळणावर चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं गाडी दरीत कोसळली. तळोदा उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी ६ जणांना मृत घोषित केलं, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी या गाडीत ३५ ते ४० भाविक होते.
Site Admin | October 18, 2025 8:07 PM | Accident | nandubar
नंदूरबार इथं रस्ते अपघातात ८ जणांचा मृत्यू
