नांदेड जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करावेत, अशी मागणी खासदार अशोक चव्हाण आणि भोकर मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या पावसामुळं झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिती दिल्याचं खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं तर, या नुकसानीचे तातडीनं पंचनामे केले जातील, असं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे.
Site Admin | June 10, 2025 3:41 PM | Nanded | Rain
नांदेडमध्ये पावसामुळे फळबागांचं नुकसान
