जनतेच्या कल्याणासाठी कुठलाही निर्णय घेतला गेला नसून केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अधिवेशन घेतल्याची विरोधी पक्षाच्या नेत्यांची टीका

या अधिवेशनात जनतेच्या कल्याणासाठी कुठलाही निर्णय घेतला गेला नसून केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अधिवेशन घेतल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नागपूरमधे वार्ताहर परिषदेत केली. कुपोषण, भ्रष्टाचार, अमली पदार्थाची विक्री याबद्दलच्या कुठल्याही प्रश्नाला सरकारने उत्तर दिलं नाही, फक्त महानगरपालिका निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून पुरवणी मागण्या मंजूर  करून घेणं हाच अधिवेशनाचा हेतू होता, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. यातून विदर्भाच्या वाट्याला काहीही आलं नसून घाईगडबडीत अधिवेशन गुंडाळल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. 

विरोधी पक्षांनी अधिवेशन चालवण्यासाठी सरकारला संपूर्ण सहकार्य केलं, मात्र एकाही मंत्र्याने अधिवेशन गांभीर्याने घेतलं नाही, अशी टीका शिवसेना   उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.