बांगलादेशातून आतापर्यंत ६,७०० हून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले

बांगलादेशातून आतापर्यंत ६ हजार ७०० हून अधिक भारतीय विद्यार्थी भारतात परतले असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली. ढाकामधल्या भारतीय उच्चायुक्तांनी भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षित प्रवासाची व्यवस्था भारत बांग्लादेश सीमेपर्यंत तसंच विमानतळापर्यंत केली आहे, विद्यार्थ्यासाठी चोवीस तास संपर्क यंत्रणा कार्यरत आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.