डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात २० कोटींहून अधिक नागरिक सहभागी – मंत्री सी. आर. पाटील

स्वच्छ भारत अभियानांतर्गत यंदा देशात २४ लाखांहून अधिक कार्यक्रम झाले. स्वच्छता ही सेवा अभियानात यावर्षी २० कोटींहून अधिक नागरिक सहभागी झाले अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी दिली आहे. देशभरातले ३८ लाख सफाई मित्र यात सहभागी झाले होते. राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.