राज्य मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत पाऊस, पीकपाणी, धरणाच्या जलाशयांमधला पाणी साठा, इत्यादींचा आढावा घेतला. राज्यातल्या सर्व प्रमुख धरणांमधे गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी यावेळी दिली. राज्यात पंधरा जूननंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असं आवाहन कृषि विभागानं केलं आहे. या बैठकीत कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातलं पीकपाणी, पेरण्या, खतपुरवठा याबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली.
मोसमी पाऊस येत्या तीन-चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी सादरीकरणाद्वारे दिली.