परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना इराणमध्ये नोकरीच्या आश्वासनांना किंवा प्रस्तावाला बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे. अलिकडेच, भारतीय नागरिकांना इराणमध्ये नोकरी देण्याचं किंवा नोकरीसाठी इतर देशांमध्ये पाठवण्याचं आमिष दाखवून फसवण्यात आल्याची प्रकरणं समोर आली आहेत.
इराणमध्ये पोहोचल्यानंतर, या भारतीय नागरिकांचं गुन्हेगारी टोळ्यांकडून अपहरण करुन त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबियांकडून खंडणी मागिण्यात आली. इराण सरकार केवळ पर्यटनाच्या उद्देशानं भारतीयांना व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी देतं आणि नोकरी किंवा इतर उद्देशांसाठी इराणमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाचं आश्वासन देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांचा संबंध गुन्हेगारी टोळ्यांशी असू शकतो, असंही परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे.