ग्रामीण रहिवाशांसाठी केंद्र सरकारच्या विविध उपाययोजना – मंत्री शिवराज सिंह चौहान

ग्रामीण भागातल्या रहिवाशांचं जीवन सुखकर करण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजन केल्या असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सांगितलं आहे. आफ्रिकन – आशियाई ग्रामविकास संघटनेच्या कार्यकारिणीच्या आज नवी दिल्लीत आयोजित बैठकीत ते बोलत होते. मनरेगा, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना, एक पेड मां के नाम, लखपती दीदी योजना अशा अनेक कल्याणकारी योजनांचा उल्लेख त्यांनी केला.