2029 पर्यंत देशाची संरक्षण उत्पादन क्षमता 3 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल सांगितलं. उत्तराखंडमधील देहरादून इथं आयोजित ‘राष्ट्रीय सुरक्षितता आणि दहशतवाद’ या विषयावरील कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. या क्षेत्रातील देशाची निर्यात 50 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
2014 मध्ये वार्षिक एकंदर 40 हजार कोटी रुपये असलेलं संरक्षण उत्पादन आज सव्वा लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झालं आहे आणि हा आतापर्यंतची ही विक्रमी आकडेवारी आहे. भारतीय बनावटीची ही उत्पादनं 100 हून अधिक देशांत निर्यात केली जातात. केंद्र सरकारनं यावर्षी पावणेदोन लाख कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. अशी माहितीही त्यांनी योवेळी दिली.