विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं- नितीन गडकरी

स्वत:साठीच नाही तर इतरांसाठीही रस्ते सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. मुंबईत ‘रस्ते सुरक्षा अभियान २०२५’च्या ‘सुरक्षा रिलोडेड’ कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. दुदैवानं गेल्या वर्षभरात रस्ते अपघातांची संख्या वाढली असून शाळा आणि संस्थात्मक क्षेत्रात १० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.