हवामान विभागाकडून रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

येत्या चोवीस तासांसाठी हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा मिळाला असून लहान होड्यांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना आहेत. वर्धा जिल्ह्यात दिगडोह इथं पूर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यात मुसळधार पावसामुळे समृद्धी महामार्गावर पुलाखाली पाणी साचल्यामुळे काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.